Thursday, June 9, 2022

शिक्षण 8



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  8

४} पुस्तकाचे नाव      :-  #शिक्षण #मनीष #सिसोदिया

५ } अनुवाद          :-  राहुल केशव कदम

६} प्रकाशक              :- मनोविकास प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  148

९} मूल्य        170  ₹  फक्त


माणूस जन्माला आल्यापासून शिक्षणाशी आपली नाळ जुळलेली असते नव्हे तर आपण गर्भातच शिकत असतो.शिक्षण मग ते शाळेतील असो नाहीतर जीवनाच्या प्रवासातील अनुभवाचे शिक्षण

शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आणि आपण आजन्म विद्यार्थीच असतो.

शिक्षण हे दिल्लीचे शिक्षण मंत्री आदरणीय मनीष सिसोदिया यांनी लिहिलेलं आणि राहुल केशव कदम यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हातात पडलं आणि शिक्षण ही एक किती व्यापक कल्पना असते याची प्रचिती आली आदरणीय मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग या पुस्तकात आपल्याला प्रत्येक पानावर  पाहायला मिळतात. शिक्षण हे पुस्तक पुण्याच्या मनोविकास प्रकाशन चे अरविंद घनश्‍याम पाटकर यांनी 22 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित केलेले आहे आदरणीय मनीष सिसोदिया साहेबांनी हे पुस्तक समर्पित करताना आपल्या सरकारी शाळेतील शिक्षकांना खूप मोठे स्थान दिलेले आहे ते म्हणतात या समर्पण पत्रिकेत


 *अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना समर्पित* 


म्हणजेच आमच्या सरकारी शाळेतील शिक्षक ही एक ध्येयवेडे काम करतात आणि एक शिक्षण मंत्री अशा शिक्षकांना आपलं पुस्तक समर्पित करतो ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या मनोगतात ते म्हणतात राजकीय इच्छाशक्ती नियोजन आणि अविरत प्रयत्न असेल तर शिक्षण क्षेत्रात चमत्कार होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची शिक्षण पद्धती.

या पुस्तकात त्यांनी दोन भाग केले आहेत पहिल्या भागात शिक्षणाची पायाभरणी आणि दुसऱ्या भागात शिक्षण बनावं जीवनाचा पाया असे दोन भाग केले आहेत सुरुवातीला दिल्ली एक आशा या प्रकरणात त्यांनी ही संकल्पना राबवण्यात पूर्वी दिल्लीतील शिक्षण पद्धती कशी होती आणि सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे याचे सखोल मार्गदर्शन केले आहे आणि थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी म्हणतात शिक्षकांच्या सहकार्याशिवाय त्यांना कार्यप्रवण बनवल्याशिवाय आणि त्यांना प्रेरित केल्याशिवाय शिक्षणक्षेत्रात कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

शिक्षणाची पायाभरणी या घटकात सुरुवातीला त्यांनी दिल्लीतील शाळांची इमारती त्यांचं रूप पालटण्यासाठी अंदाजपत्रक तयार केलं आणि ही एक महत्त्वपूर्ण  निर्णायक घटना या ठिकाणी घडलेली आहे आपले खर्च एक चतुर्थांश रक्कम शिक्षणासाठी राखून ठेवण्याचे धाडस करणारे हेच देशातील बहुदा पहिलेच सरकार होते.

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा या ठिकाणी घालण्यात आला आणि सर्वप्रथम वर्गखोल्या क्रीडांगणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे सद्यस्थितीची माहिती करून घेऊन त्यांचा विकास या ठिकाणी करण्यात आला. स्वतःचे घर बांधताना जसे आपण लक्ष घालतो तसे लक्ष लक्ष त्यांनी सरकारी शाळांच्या बांधकामात ते घालत होते आणि अर्थातच त्यांच्या मनातील भावना ही जवळपास तशीच होती सरकारी शाळांचा रूप त्यांनी बदलून टाकलं.

आव्हान परंपरेला छेद देण्याचं यामध्ये  मुलांसाठी मुलांचा विकास होण्यासाठी त्यांच्याशी क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार करण्यात आले आणि यामध्ये वाचन अक्षमता आणि मूलभूत गणित याचे आकलन कसे होईल यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावी यासाठी प्रतिभा ,निष्ठा, नवनिष्ठा असे गट तयार करण्यात आले. वाचनासाठी आणि गणितीय मूलभूत क्रियांसाठी उपक्रम राबवले .  वेगवेगळे अतिशय उच्च दर्जाचे उपक्रम त्यांनी राबवले. खरोखरच छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या स्वप्नांना गवसणी घालणे शक्य होते हे त्यांनी या विविध उपक्रमातून दाखवून दिले.

मुख्याध्यापक शाळेचा कप्तान यामध्ये ते म्हणतात विमानात पायलटची भूमिका असते तीच भूमिका आज शिक्षणक्षेत्रात प्रत्येक शिक्षक पार पाडत असतो .त्यामुळे जसा नेता तशी प्रजा .यासाठीच मुख्याध्यापकांच सक्षमीकरण करणं खूप गरजेचं वाटत होतं आणि यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करायचं ठरवलं.  त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सक्षम मुख्याध्यापक म्हणून तयार केलं .सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतील शाळेचे मुख्याध्यापक हे एक तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससी त्या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले आहेत किंवा त्यांना उपमुख्याध्यापक पदावरून पदोन्नती मिळाली आहे .एवढे सक्षम मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते .आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण त्यांनी मुख्याध्यापकांना देऊ केले या त्यांच्या प्रयत्नांमुळे काही सरकारी शाळांना सर्जनशील नेतृत्व मिळालं. त्यांनी पुढे जाऊन या उमलत्या कळ्यांना सुजाण आणि सुशिक्षित नागरिक बनवण्याचे व्रत हाती घेतले.

शिक्षक विश्वासाची पुनर्स्थापना यामध्ये त्यांनी प्रेरक शिक्षकांचा शोध घेतला.  ज्यांनी आपला जिद्द आणि उत्साह दाखवला त्यांना प्रेरक शिक्षक करून विशेष प्रशिक्षण देण्यात आले .या प्रेरक शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती करून देणे हे काम केलं.प्रेरक शिक्षक आपलं अनुभव सांगताना म्हणतात प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे स्वतःला सिद्ध करावयाचे असते त्यांनी अशा अडचणींची पर्वा करून चालत नाही.

पालक एक महत्त्वपूर्ण घटक मुलांच्या शिक्षणाबाबत पालक आणि शिक्षक हे जणू दोन धुवा सारखे असतात त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचाही विकास करणं खूप गरजेचं आहे आणि ही गरज ओळखूनच शाळा व्यवस्थापन समित्या त्यांनी अधिकच सक्षमा बनवल्या.त्यांची निवडणूक लावली आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शाळा व्यवस्थापन समित्या व त्यातली सदस्य यांची निवड होऊ लागली. शाळेतील पालकांचा सहभाग वाढवला. यासाठी त्यांनी मेघा पीटीएम पालक शिक्षक महामेळावा आयोजित केला.  महामेळाव्याचे विविध अनुभव त्यांनी विस्तृत  या ठिकाणी सादर केलेले आहेत.

या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे शिक्षण बनावं जीवनाचा पाया.

यामध्ये जीवन विद्या शिबीर सहजीवनाची शैक्षणिक प्रारूप या संकल्पनेची रचना करण्यात आली यामध्ये वीस वर्षांच्या प्रवासानंतर मुलांकडून काय अपेक्षा आहेत त्यांना कोणत्या रुपात पाहणे आवडेल हे ध्येय निश्चित करणं आवश्यक होतं आणि या सर्वांचा विचार मान्य करून हे जीवन विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

आनंद वर्गाची भन्नाट कल्पना 

यांचा दिल्लीच्या सरकारी शाळेतील आनंद वर्ग दिल्लीतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे या शाळेतील एक विद्यार्थी दररोज एक तास नेमकं काय शिकतात हे या आनंद वर्गातून आपल्याला समजेल अशा प्रकारचे आनंद वर्ग मुलांची मानसिकता सकारात्मक आणि सर्जनशील करतात या आनंद वर्गाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आणि त्या अनुभवांची ही मांडणी याठिकाणी करण्यात आलेली आहे .या आनंद वर्गाची बीजे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्र चर्चेत राहून तयार केली आहेत .या आनंद वर्गाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे होता.

यामध्ये

1 सजग ध्यानधारणा

 2 विद्यार्थ्यांना अधिक जबाबदार आणि प्रगल्भ बनवण्यासाठी सांगितलेल्या प्रेरणादायी कथा

3 विद्यार्थी स्वतःचे विचार आणि प्रतिक्रिया वैज्ञानिक दृष्ट्या समजू शकतील असे उपक्रम

असा हा आनंद वर्ग दररोज आठ लाख विद्यार्थी घेत होते ही खचितच साधी बाब नव्हे यामधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानप्राप्तीचा विचारदेखील सर्वांनाच रोमांचित करतो.

उज्वल भविष्याची नांदी या आपल्या शेवटच्या प्रकरणात ते म्हणतात की मी आजवर या केलेल्या सर्व नवनवीन उपक्रमांची उज्वल नांदी येत्या काही दिवसात सर्वांनाच पाहायला मिळेल .नुसती नोकरी करण्यासाठी शिक्षण नको तर इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास शिक्षण आपण घेतलं पाहिजे . या विचारातूनच त्यांनी नवउद्यमी मानसिकता अभ्यासक्रम अनेक तज्ञ आणि मान्यवरांच्या चर्चेतून तयार केला . वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेरील या जगाची ओळख होण्याच्या दृष्टीने इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला . रोजगाराच्या वाटा या अभ्यासक्रमातून भावी पिढीसाठी निर्माण झाल्या. ही तर फक्त सुरुवात आहे अजून पुढच्या काही दिवसात याचं खरं स्वरूप या शिकलेल्या मुलांच्या तून आपल्याला दिसून येईल. या सार्‍या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहृदय पूर्वक मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश मानायला ते विसरले नाहीत .आपल्या शेवटच्या प्रकरणात ज्या अनेक छोट्या मोठ्या हाताने त्यांना मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश त्याठिकाणी मांडलेले आहेत. खरोखरच शिक्षण माणसाला प्रगल्भ आणि सुसंस्कारित करत असतं या त्यांच्या विविध उपक्रमांत बरोबरच त्यांना आपल्या सरकारी शाळेत देशभक्ती शिकवणारा अभ्यासक्रमही सुरू करावयाचा आहे आणि लवकरच ते आपल्या शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू करतील .दिल्लीच्या सरकारी शाळांमधून शिकणारे हे असंख्य विद्यार्थी उद्या भारताचे एक उत्तम आणि सुसंस्कारीत नागरिक झाल्या शिवाय राहणार नाहीत. प्रत्येक शिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी यांनी या पुस्तकाचं वाचन करून आपल्या चिमुकल्या मुलांचे भवितव्य उज्वल कसं होईल याचा विचार करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी उज्वल आणि उत्क्रांती करणारा घडतं तिथं आपण आपली सदिच्छा भेट देऊन काहीतरी आपल्या भविष्यासाठी अनुभवांची शिदोरी घेतली पाहिजे. तेव्हा नक्की हे पुस्तक वाचा. 

या पुस्तकात एकूण 148 पृष्ठ असून या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतिशय सुंदर आहे. सर्वसामान्य घरातील मुलं या मुखपृष्ठावर हसताना आणि एक नवी आशा निर्माण करताना दिसत आहेत .मनाला भावणारे आणि प्रफुल्लित करणारं असे हे मुखपृष्ठ शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकालाच नवी उभारी देणार अस आहे.

अशी वेगवेगळी पुस्तकं वाचूया आणि आपला देश सुसंस्कारित घडवूया.

धन्यवाद🙏🏻🌹🌹✒️📚


 *सौ.अंजली शशिकांत गोडसे                             मर्ढे सातारा*

No comments:

Post a Comment