*सावित्रीबाई फुले*📚✒️
*लेखिका माधुरी साकुळकर* ✒️📚
⛳ *पुस्तक समीक्षा* ⛳
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .आजच्या या दिनाचे औचित्य साधून एका सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले असे शीर्षक देऊन क्रांतीज्योतीला वाहिलेली शब्द पुष्पांजली पारखण्याचं भाग्य मला मिळालं यातच माझ्या जीवनाचं कृतार्थ झाले .
सावित्रीबाई फुले या माधुरी साकुळकर लिखित पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत . प्रत्येक प्रकरणात माधुरी ताईंनी त्यांचे लेखनशैलीतून स्वतःचे वेगळेपण जपले आहे . पहिले प्रकरण पार्श्वभूमी पासून सुरू होऊन ते शेवटचे प्रकरण अखेरचा श्वास इथपर्यंत सावित्रीबाईंचा सारा जीवनप्रवास आपल्या शब्दांतून त्यांनी अगदी ओघवता रेखाटला आहे .
माधुरीताई म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात इतके पदर ! इतके पापुद्रे ! एक सोलावा तर दुसरा पापुद्रा निघतो . ही सर्व काही अशक्यकोटीतलं ! ज्या काळी स्त्री शिक्षणाची उदासीनता होती त्या काळात समस्त महिला वर्गात सावित्रीबाईरूपी ज्ञानाची ज्योत महात्मा फुले यांनी स्वतःच्याच घरात लावली . याच ज्ञानज्योतीची आता घराघरात ज्योत पेटली आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या तेजाने ती दिवस-रात्र अखंड तळपत आहे .मातीची पाटी आणि झाडाच्या फांद्यांची लेखणी करून शिक्षण वसा घेतलेल्या सावित्रीबाईंना साक्षात त्यांच्या कुंकवाचे आणि काळ्या आईचे भरभरून आशीर्वाद पाठीशी होते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात खंडोजीराव आणि लक्ष्मीबाई नेवसे पाटील या उभयतांचे पोटी सावित्री हे कन्या रत्न जन्माला आले .लहानपणापासूनच धाडसी ,दणकट असणारी सर्वांची लाडकी सावू धीट आणि जिद्दी होती. वयाच्या नवव्या वर्षीच सावू १८४० साली सौ.सावित्री ज्योतिबा फुले झाली. ज्योतीबांच्या संसारात रममाण होत सावित्रीबाई त्यांच्या साथीने ज्ञानाच्या अखंड महासागरात बुडून गेल्या . मातीवरची अक्षरे कधी हृदयात घुसून बसली हे कळलेच नाही .१८४०ते१८४८ या काळात त्या भरपूर शिकल्या. बहुश्रूत झाल्या. १८४८ साली पुण्यामधल्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली .पहिल्याच मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका म्हणून काम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. भारताच्या इतिहासात भारतीय थोर आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन इतरांच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला. शैक्षणिक कार्याबरोबरच सावित्रीबाई सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. यावर विस्तृत लेखन माधुरी ताईंनी आपल्या लेखणीतून केलेले आहे. सावित्रीबाई या बहुगुणी होत्या.काव्यफुलें आणि बावनकशी सुबोध रत्नाकर असे दोन कवितासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत.
काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे आणि या देणगीच्या परिसस्पर्शाने काव्य निर्मिती होते ती तनमनापर्यंत पोहोचते.याच त्यांच्यातील दैवी देणगीचे दर्शन या त्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहातून झाल्याशिवाय राहत नाही. काव्य कसे बहरते हे सांगणाऱ्या काही कविताही या संग्रहात आहेत ज्या रसिकांचे लक्ष वेधून घेतात. संसाराची वाट या कवितेत त्या ज्योतीरावांबद्दल म्हणतात
**माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद*
*जैसा मकरंद कळीतला**
याच कवितेत शेवटी त्या म्हणतात
*करून प्रपंच | आहे तो कठीण*
*बोलून हा शीण I जाईल का?*
तसेच सावित्रीबाईंच्या पत्रांमधून त्यांची अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचे आदर्श सहजीवन तसे त्यांनी केलेला त्याग डोळ्यासमोर उभा ठाकतो .रुग्णांची सेवा करतच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि एका क्रांती पर्वाचा अंत झाला . पण या ज्योतीने लावलेल्या ज्योतींनी सारा प्रदेश ज्ञान प्रकाशात लख्ख केलेला आहे .खरोखरच सावित्रीबाईं विषयी माधुरी ताईंनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवता येईल असंच आहे . सर्वांनी नक्की वाचावे असे हे आदर्शवत पुस्तक . माधुरीताईंच्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹 धन्यवाद🙏🏻🙏🏻
*पुस्तकातील पाने १०५*
*पुस्तकाची किंमत ७० रुपये*
*पुस्तक समीक्षण* ✒️📚
*सौ. अंजली शशिकांत गोडसे*
*मर्ढे सातारा*🌹🌹
अप्रतिम..
ReplyDeleteसुंदर समीक्षण..
अप्रतिम अक्षरवैभवात पुस्तक परिचय
ReplyDeleteVery nice Anjali...Keep it up...
ReplyDeleteपुस्तक समिक्षणाच्या रूपात सावित्री बाईनांही एक शब्दांजली अर्पण अप्रतिम अंजली मॅडम
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद🙏🌹🌹🚩
ReplyDeleteखूप छान, अंजू
ReplyDelete